सीबीडी-बेलापूर, आग्रोली परिसरात तरुणांनी वाटप केले गरजूंना अन्न पाकिटे


नवी मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन ची परिस्थिती आहे, कोरोना रोगाला आपल्याला हरवायचं आहे, परंतु असे करत असताना त्याम्चे हातावर पोट आहे, जी लोक मजूर, रोजंदारी वर काम करत आहेत, त्यांची बिकट अवस्था आहे. 


दोन वेळेचे पुरेसे अन्न न मिळणे किंवा न मिळणेचे ही परिस्थिती सर्वत्र दिसत आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन, अनेक संस्था पातळीवर खूप प्रयत्न सुरू आहेत. 


असाच प्रयत्न दिवाळे, आग्रोली गावातील तरुणांनी एकत्र येऊन केल्याचे दिसत आहे. या गावातील नवीन कोळी, मनोज डोंगरे, महेश मोकल, चेतन वाघ, जयेश भोईर, दिनेश माळी, विनय पाटील, प्रणय ठाकूर ह्या तरुणांनी पुढाकार घेऊन दररोज गरजूंना किमान 200 पाकिटे वाटप करत आहेत. 


ही तरुण मंडळी आपल्या मित्रांकडून कोणतेही रक्कम न घेता, दररोज लागणारे साहित्य घेत आहेत, त्यातून ही अन्न पाकिटे तयार करून वाटत आहेत. 



आग्रोली-सीबीडी बेलापूर परिसरात आपल्याला अशी गरजू व्यक्ती दिसल्यास किंवा आपल्याला ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास आम्हांला खालील नंबर वर संपर्क करावे!


मनोज डोंगरे 9867947323
चेतन वाघ 9821994230
महेश मोकल 9819734841
जयेश भोईर 8898929256
दिनेश माळी 9769959533
विनय पाटील 7506968009
प्रणय ठाकूर 9870855246