ठाणे हॉटेल असोसिएशनची ठाणेकरांसाठी धाव


दररोज 2000 जणांना जेवण
ठाणे : हॉटेल ही शहरी जनजीवनाची गरज बनलीय. कितीही महाग मिळो तरीही हॉटेलवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कोट्यावधी आहे. या कोरोनाच्या महामारीत सर्वप्रथम हॉटेल अन् बार बंद असले तरी दोनवेळचा घास पोटात जावा म्हणून ठाण्याच्या हॉटेल असोसिएशनने आता गोरगरीब ठाणेकरांसाठी सरसावली असून दररोज सकाळ संध्याकाळ 2000 जणांचं जेवण संस्था देणार आहे.


असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, रघुनाथ शेट्टी, प्रशांत शेट्टी, कुशल भंडारी आणि उद्योजक रत्नाकर शेट्टी यांच्या प्रयत्नाने ही सेवा कालपासून सुरू झाली असून संचारबंदी सुरू असेपर्यंत गरजूंना दोनवेळचे जेवणे दिले जाणार आहे.