महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी हरवलं


मेलबर्न : महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये WT20 World Cup ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी हरवलं आहे. या जबरदस्त विजयानंतर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव  कोरलं आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने २० ओव्हरमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. भारताकडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी १८५ धावांचं आव्हान होतं. मात्र, भारतीय संघ अवघ्या ९९ धावांमध्येच गारद झाला.


ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचला होता. तर भारतीय संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये खेळला.


भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याशिवाय वेदा कृष्मामूर्तीने १९, रुचा घोषने १८, स्मृती मंधाना ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने चार आणि जेस जोनासनने तीन तर सोफी मोलिन्यूक्स, डेलिसा किमिंस आणि निकोला कॅरीने एक-एक विकेट घेतली.


ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. तर एलिसा हिलीने ३९ बॉलमध्ये ७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ मध्येही टी-२० विश्वचषक जिंकला होता.